लग्नं...
एक सुंदर स्वप्न जे प्रत्येक तरुण आपल्या मनात कोरतो ....
आपला जोडीदार कसा असावा, या विषयी कल्पना नसलेला आज पर्यंत मी पाहिलेला / पाहिलेली नाही...
हा विषय आज एवढ्यासाठी आला कारण परवाच माझ्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. सगळ्याच आनंदी वातावरणात मी मात्रं जरा विचारात होते; जी मुलगी M .Sc. झाल्यानंतर सुद्धा हुंडा किंवा वरदक्षिणा या नावाखाली लाखोन रुपये खर्च करावे लागले. मग या सगळ्या शिक्षणाचा आणि प्रगत विचार असण्याचा काय उपयोग होता/ आहे ?
मुलगी कितीही सुंदर/ अनुरूप असली किंवा कितीही उच्च शिक्षित असली तरीही तिला या वरदक्षिणा तून काही सूट मिळत नाही, आणखी कशी मिळेल या सर्वाना एक बाजूनी मुलीचे पालक हि जबाबदार असतात. सर्व आई- बाबांना आपली मुलगी सुखात ठेवण्यासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला "लाच" हि द्यावीच लागते !!!
आयुष्याची सुंदर सुरवात करताना किती लोक हा विचार करतात कि त्याचे / तिचे विचार जुळतात. बाह्य सुंदरते पेक्षा किती लोग एकमेकाला समजून घेण्याची पातळी बघतात? किती लोग हा विचार करतात मला ठाऊक नाही , पण बहुतांशी लोक मला सुंदरता, वरदक्षिणा या मध्ये इंटरेस्टेड वाटतात.अजून एक गोष्ट, सर्वच मुलांना आपली होणारी नववधू हि सुंदर हवी, वेल studied हवी , आणि मेन गोष्ट ती वेल cultured हवी. आता या well ( वेल) या लेबलखाली त्यांची काय अपेक्षा असते हे अगदीच सांगण अवघड आहे.
आजकाल या so called प्रगत जगात modernization च्या नावाखाली आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण सर्व बाबतीत करतो पण महत्वाचं विचारांचं modernization हुंड्यामध्ये विसरून जातो (चुकून modernizationने त्या हुंड्या मध्ये फ्रीज, टीव्ही, मिक्रोवेव, वाशिंग मशीन.... add केले आहे).
या हुंड्या/ मानपाना पायी मग बरंच रामायण महाभारत घडतं. अगदीच मुलीला कायमचं माहेरी पाठवण्या पासून ते तिला जीवे मारण्या पर्यंत...
तिची स्वप्नं....
करीन सखे मी संसार,
आवडते माझ घर दार,
प्रसन्न पतीराज करुनी,
बनेन खाशी शुभ रजनी...
तिच्या आशा...डाव मोडून पडतो ..... ना स्वप्नातली राजा अन राणी.....