Saturday, February 19, 2011

मैत्री..

आज मी पहिला पोस्ट लिहित आहे , विचार केला कि काय लिहावं ?.. आणि पुढच्याच  क्षणी लिहीलं गेलं " मैत्री".  माझा हा पहिला पोस्ट अश्याच एका मित्रासाठी ज्यांनी मला ब्लोग लिहायला शिकवला.
           "मैत्री" आणि "मोगरा " या दोन गोष्टी ज्या मला खूप आवडतात, 
           ज्यांच्या भोवतालीच्या जाणिवेन जगाचा विसर होतो ... 
           आणि अर्थात तो क्षण जगल्याचा आनंद ...

मी एक गोष्ट  ऐकली होती,जी खूप सुंदर आहे.,
      एकदा काय होत कि, एक मनुष्य  आपला भूतकाळाचा प्रवास कसा झाला आपल्या बरोबर कोणी कोणी साथ दिली हे पाहायचं ठरवतो, देव त्याला एक वर देतो कि," तुला तुझा भूतकाळाचा प्रवास तुला तुझ्या पायांच्या ढस्याच्या स्वरुपात दिसेल". त्याला दिसत कि त्याच्या पायांच्या  बरोबर नाहामी दो पाऊले आहेत. तो देवाला विचारतो कि माझ्या पायाच्या ठस्यांच्या  बरोबर हे दोन पायेंचे ठसे कोणाचे आहेत? देव सांगतो "ते दोन पायांचे ठसे माझे आहेत". हे ऐकताच त्याला खूप आनंद होतो, नेहमी साथ दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो, थोड्या वेळानं त्याला लक्षात येत कि, काही ठिकाणी फक्त दोनच पाऊले आहेत, ते क्षण तर दुःखाचे, अडचणीचे  आहेत. मनुष्याला खूप वाईट वाटत कि दुःखाच्या प्रसंगी देवाने अपनाल साथ दिली नाही, तो परत देवाला विचारतो, "तू मला अडचणीच्या वेळेला का एकटे  सोडून दिलेस ?" देव म्हणतो, " अरे ते दोन पायांचे ठसे माझे आहेत त्या वेळी तर मी तुला माझ्या खांद्यावर घेतलं  होतं! "
          आजच्या या युगातल्या मनुष्याची गोष्ट जरा वेगळी आहे, १९९९ मध्ये जगाची लोकसंख्या हि एक बिल्लीओन (1000000000) होती .  देवाकडे एवढाही वेळ नसेल कि तो सर्वांसोबत राहील म्हणून त्याने एक नातं  प्रत्येकाला दिल, ते नातं  आहे "मैत्रीच". "मैत्री " आपल्या बरोबर गोष्टीतल्या देवासारखी सोबत देणारी आणि प्रसंगी आपल्याला खांद्यावर घेणारी!...